Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

शरद पवारांनी काय केले ? ...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





देशाचे गृह मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भर प्रचारात लोकांची दिशाभूल करतांना सांगतात शरद पवारानी काय केले ?



BY ऑनलाईन तरुण गर्जना
१४ ऑक्टोबर २०१९

पंकज पाटील (उपसंपादक)

विधानसभेत शरद पवारांचे गुणगान करणार हे मुख्यमंत्र्यांचे भुत तर नाही ना ?

जनतेची दिशाभूल करण्यासाठी प्रचारात सर्वच पक्षांकडून कस खोट बोलल जात त्याचे हे प्रमाण आहे.त्यातही भारतीय जनता पार्टीने तर सर्वच सीमा पार केल्यात .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत देशाचे तत्कालीन कृषिमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी काय केले याचे तोंड भरून कौतुक करतांना सांगतात . १९७४ रोजी ते कॅबिनेट मंत्री झाले त्यावेळेस आग्रहाने कृषी खाते मागून घेतले .तसेच मनमोहन सिंह हे देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा देखिल त्यांनी आग्रहाने कृषी खाते मागून घेतले.सतत दहा वर्ष कृषी खाते सांभाळत देशाचा प्रगतीचा  आलेख वाढवला .भारताच्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी देशाला कसे समर्पित केले हे खुद्द मुख्यमंत्री यांच्याच तोंडातुन निघालेले शब्द आहेत. त्यांचा कामकाजाचा पाढा वाचतांना देखिल त्यांना हातात कागद घेवून बोलावे लागले  हेही लक्षात घेण्यासारखे आहे.


त्या कालावधीत त्यानी काय कामे केलीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याच  तोंडून ऐका .... उघडा डोळे बघा नीट  व ऐका लक्ष पुर्वक ’’



राजकारणातून बरेच काही शिकण्यासारखे आहे चार भिंतीत नेते काय बोलतात व सार्वजनिक व्यासपीठावर सत्तेसाठी कसे उणे-दुने काढतात हे यावरून लक्षात येते .परिस्थितीनुरूप या राजकारणातील माणसे आपला रंग कसे बदलतात हे लक्षात घेण्यासारखे आहे . शरद पवार साहेब यांनी केलेले कृषी धोरण हे देखिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १५० वर्षापुर्वी केलेल्या अभ्यासाचे फलित आहे .फरक एवढाच खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले आत्मसात केले शरद पवारांनी . फडणवीस यांनी आत्मसात केले शरद पवारांना व गुण-गाण ही केले पवार साहेबांचे. फडणवीस साहेबांना हे देखिल माहित नाही ते वाचत असलेले विचार हे जरी पवार साहेबांचे होते तरी त्यांचे जनक  महात्मा ज्योतिबा फुलेचे होते.  भारतीय जनता पार्टी ही फक्त बातोकी दुकानमुगेरीलाल के हसीन सपने दाखवण्याचे काम या महाराष्ट्रात करत आहे.हिंद्त्वाच्या केशरी कापडाने भक्तांचे डोळे झाकण्यात आले असून त्यांना अंधारात ढकलण्याचे पाप सत्ताधारी पक्षाचे चालू आहे .


आज बदलत्या आर्थिक व्यवस्थेमुळे सर्वात कष्टदायी जिवन शेतकऱ्याचे झाले आहे .जो एका दाण्याचे शंभर दाणे पिकवतो व संपुर्ण जगाला खावू घालतो तोच आज उपाशी व कर्जबाजारी आहे .त्याचा विचार होणे गरजेचे आहे . आजच्या  घडीला शरद पवार साहेब यांनी २००८ साली केलेल्या सरसकट कर्ज माफीची गरज शेतकऱ्यांना आहे.त्याच बरोबर शेतीला पाणी व सिंचनाची १०० % अनुदानीत व्यवस्था होणे देखील  आवश्यक आहे . सत्ताधारी पक्षाकडे ना तो दृष्टीकोन आहे ना अभ्यास . अभ्यास पुर्ण व्यक्तिमहत्व म्हणजे शरद पवार . सत्ताधारी पक्षाचा  कर्ज माफीचा अभ्यास व निकष जनतेला पाच वर्षात चांगलाच कळला.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध