Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २ जुलै, २०२१

आंतरजातीय विवाहितांना ‘सामाजिक न्याया’चे बळ…!



620 जोडप्यांना 2 कोटी 60 लाख 38  वाटप..!


राज्यातील जातीयता, भेदाभेद कमी करण्यासाठी व जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते.सन 2020-21 मध्ये नाशिक विभागातील 620 विवाहित जोडप्यांना 2 कोटी 60 लाख रूपयांचे अर्थसहाय्याचे तात्काळ वाटप केले आहे.  अर्थसहाय्य मिळाल्यामुळे विवाहित जोडप्यांच्या संसाराला आर्थिीक बळ मिळाले आहे.

अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांपैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत,बौध्द,शीख या पैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास आंतरजातीय विवाह म्हटला जातो.तसेच अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गामधील आंतरप्रवर्गातील विवाहित जोडप्यांच्या विवाहास ही आंतरजातीय विवाह म्हणून शासन मान्यता आहे.  

या योजनेत प्रत्येक जोडप्याला रू.50 हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येत असते.
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना पती व पत्नीच्या संयुक्त नावाने धनाकर्ष प्रदान करण्यात येत असतो.सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद या कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येत असते.नाशिक विभागात सन 2020-21 या आर्थिधक वर्षात 620 जोडप्यांना 2 कोटी 60 लाख रूपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. यात नाशिक -120 जोडप्यांना 60 लाख रूपये,धुळे -100 जोडप्यांना 50 लाख रूपये,नंदुरबार-60 जोडप्यांना 30 लाख रूपये,जळगांव - 120 जोडप्यांना 60 लाख रूपये,अहमदनगर - 120 जोडप्यांना 60 लाख रूपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले.


आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिलक सहाय्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी  पती-पत्नी हे महाराष्ट्रातील रहिवाशी असावेत.  जातीचा दाखला व आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वरील कागदपत्रांची पूर्तता करून अर्जदार यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध