Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
तालुक्यात हजार झाडे असल्यासच ताडीची विक्रीचा परवाना देता येईल..! या सरकारच्या 20 नोव्हेंबर 2016 च्या अध्यादेशावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब..!
तालुक्यात हजार झाडे असल्यासच ताडीची विक्रीचा परवाना देता येईल..! या सरकारच्या 20 नोव्हेंबर 2016 च्या अध्यादेशावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब..!
मुंबई - तालुक्यात ताडीची हजार झाडे असतील तरच स्थानिकांना ताडीविक्रीचा परवाना देता येईल,या सरकारच्या 20 नोव्हेंबर 2016 च्या अध्यादेशावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. सरकारने घेतलेला निर्णय जनहितासाठी असल्याचे मत नोंदवत सरकारचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. सरकारच्या या निर्णयामुळे ताडीची झाडे नसलेल्या मुंबईत ताडी मिळू शकणार नाही.
उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या अध्यादेशाला संदेश शशिकांत नार्वेकर या ताडी विक्रेत्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या.अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सरकारी अध्यादेशामुळे राज्यघटनेने दिलेल्या व्यवसाय स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा येत आहे, असे त्यांचे म्हणणे होते.दरवर्षी लिलावाद्वारे परवाने मिळवावे लागतात, सरकारचा हा निर्णय लागू होण्यापूर्वी चार वर्षांसाठी मिळणाऱ्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची तरतूद होती.कित्येक वर्षांपासून आमचा हा पिढीजात व्यवसाय आहे, असा दावा याचिकाकर्त्याने केला.
दारू आणि ताडी विक्रीसाठी राज्यघटनेतील 14 आणि 19 हे व्यवसाय स्वातंत्र्याचे कलम लागू होत नाही, असा युक्तिवाद सरकारतर्फे वकील अभिनंदन वग्यानी यांनी केला. भारतीय घटनेच्या कलम 47 अंतर्गत राज्यस्तरावर नियमावली जारी करता येते. त्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी खंडपीठाला सांगितले. ताडी विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी तालुक्यात 500 झाडांची अट यापूर्वी होती. ताडाच्या एका झाडापासून 200 लिटरपर्यंत ताडी मिळते. मात्र, विक्री 500 ते हजार लिटरपर्यंत केली जाते.याचा याचा अर्थ त्यात "क्लोरोहायड्रेट' मिसळून भेसळ केली जाते.ताडी काढल्यानंतर काही वेळातच ती प्यायची असते,पण विक्रीच्या उद्देशाने तिची साठवणूक केली जाते.ताडीची शुद्धताही वाहतूक करताना कमी होत असते. ताडी विक्रीचा व्यवसाय स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आहे.मात्र त्यात भेसळ करून व्यावसायिक स्तरावर वाहतूक करून विक्री करण्यावरही सरकारने आक्षेप घेतले होते.ताडीत होत असलेली भेसळ रोखण्यासाठी सरकारने निर्णय घेतल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
एकाधिकारशाही बेकायदा पिढीजात व्यवसाय असल्याचा याचिकाकर्त्यांचा मुद्दा खोडून काढत दारू आणि ताडी विक्री व्यवसायात एकाधिकारशाही असू शकत नाही,त्यामुळे परवाना हवा असेल तर लिलावाद्वारे तो मिळवावा लागेल,असेही सरकारने स्पष्ट केले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा