Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

शेतकरी अन् ....सध्य परीस्थिती...!



साधारणतः शेतकर्‍यांच जे काही कष्टमय जीवन चाललय त्याबद्दल कोणाला विशेष काही वाटतच नाही अस् वाटत राहतयं....कारण त्यांच्याकड बगायला मुळात वेळ आहेच कोणाला..अन् अस पण शेतकर्‍यांना विचारतो कोण,  कारण त्याशिवाय किती महत्वाचे मुद्दे पडलेत नाही का....?
 
प्रत्येकवेळी शेतकरी दुर्लक्षीतच राहत आलाय. थोडसं माग वळून पाहूया म्हणजे समजेल...

कोरोना राष्ट्रीय महामारी घोषीत करण्यात आली सर्व क्षेत्रात लॉकडाउन करण्यात आलं त्यावेळी फक्त शेतकरी राजा साठी लॉकडाउन नव्हत कारण नोकरदार, व्यवसिंयक अन् उच्च स्तरीय ज्याला आपण High profiled म्हणतो  त्यांच्यासारख  सासवून ठेवलेल नसत ना या शेतकऱ्याकड अन् जरी असलं तरी आयत् बसून खान त्याला जमत नाही.. तरीही चित्र दाखवल गेलं ते उत्तम स्थितीत असणार्याचच, पण या काळात शेतकर्‍यांची एकही अडचण ना कुठल्या मिडियाने दाखवली ना कोणी तोंडातून ब्र काढलं,ना कोणी त्याबाबत दखल घेतली. एवढंच नव्हे तर जस् की यांना करोना होणारच नाही अथवा कोणाला झालाच नाही अस् चित्र आजही दाखवलं जातय,तर दुसरीकडं एखादा तथाकथित अभिनेता अभिनेत्री ला थोडफार जरी काही झालं तरी अगदी क्षणो क्षणी सर्वत्र चर्चा होते. 

कारण मिडीया ला TRP हवा असतो नेत्यांना चर्चेत राहयच असतय अन् तुम्हा आम्हाला कुठला तर एखादा विषय हवा असतो फक्त त्या विषयात शेतकर्‍यांचा कुठला विषय नसला पाहीजे.

त्यानंतर मध्ये सुशांत सिंग राजपूत आत्महत्या काय करतो, अस वातावरण निर्माण होत जस् काय हा एकमेव देशाचा राष्ट्रीय प्रश्न आहे अन् यापुर्वी देशात कोणी आत्महत्याच केली नव्हती. पुन्हा त्यात Film Industry, मिडिया, केंद्र - राज्य सरकार, राजकीय नेते ते त्यांचे तथाकथित कट्टर समर्थक विरोधक वगैरे वगैरे प्रत्येकजन आपापली पोळी भाजून घेतायत. परंतु याच काळात पावसामुळे शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरवला जातो, उडीद अन् इतर पिकांचा शेतातच चिखल होतोय, फळबाग उध्वस्त झाल्यात, उस पुर्णपणे झोपलाय पण याची ना कोणाला खबर आहे ना कोणी विचारायला आले आहे, पंचनामे होण अन् नुकसान भरपाई मिळनं तर दूरची गोष्ट.तरीही  जरी केलाच प्रयत्न तरी सांगीतल जाते मोठ्या साहेबांची परवानगी घ्यावी लागल जी परवानगी एखाद्या नेत्याने दौरा काढल्याशिवाय मिळतच नाही कधी. तस्स हे सगळ शेतकर्‍यांने ग्रहीतच धरलय् त्याला बिचाऱ्याला माहीतच झालंय, एकांतात पडलेल्या पिकाकड पाहत ते पिक वाढवण्यासाठी  राब राब राबलेल् आठवून डोळ वलं करून घेणं एवढच आपल्या हातात आहे फक्त म्हणून. 

परंतु यावेळीही  तुम्ही आम्ही अन् बाकी सगळ्यानंसाठी मात्र सुशांत प्रकारणाला  यातून कस् वळन लागतय अन् रिया चक्रवती, बिहार निवडणुका, मुंबई पोलिस  पासून ते आत्ताच्या कंगना राणावत विषयापर्यंत विषय महत्त्वाचे वाटतात..किळस, उबग, वीट, तिटकारा असे शब्द कमी पडतील अशी कामगिरी समस्तजंनाकडुन चालुय...
 या सर्वात शेतकरी त्याच्या समस्या तर लांबच देशाच्या या काळातल्या समस्याकडही सपशेल दुर्लक्ष होतय.  

या अशा परिस्थितीत GDP वाढनं तर दूर, स्थिर ठेवनंही शक्य झालेलं नाही त्यावर उपाययोजना करण्याच सोडून तेच तेच विषय चघवळले जातात अन् आपणही त्यातच रममाण होतोत. अनखी एक अधोरेखित करण्या सारखी गोष्ट म्हणजे याही काळात फक्त शेती क्षेत्रात GDP वाढ दिसून येतेय. मात्र याबाबतीत  चर्चा मात्र कुठ नाही दिसून आली.
 
पण हे असच् कधी पर्यंत चालणार..शेतकर्‍यांच्या समस्या विषयावर कोण काय बोलणार की नाही..
काही महत्त्वाच्या समस्या / प्रश्न 1) शेतकर्याच्या कोनत्याच पिकाला हमी भाव दिला जात नाही , त्यामुळे दलाल शेतकर्या कडुन शेतिमाल कमी भावाने विकत घेउन शहरा च्या ठीकाणी कित्तीतरी आधिक भावाने विकतात .
2) शेतमालाची बाजारपेठ शेतकर्या च्या हातात नाही.
3) जसे भारतात कोनत्याही वस्तुची फिक्स कींमत आहे तर मग शेतीमालाचिच का नाही..?
उदा : कांदे 20 रुपये किलो आहेत तर संपुर्ण भारतात 20 रु किलो नेच विकले गेले पाहिजेत ना.. पण होतेय काय शेतकर्‍यांकडुन  5 रुपये किलो ने घेउन ते 20 रुपये कीलो ने कसकाय विकले जातात...मग काळाबाजार नाही का.. ?
4) शेतकर्याने कष्ट करुन शेतीत माल पिकवला तरी तो त्या शेतमालाची व त्याच्य कष्टाची किंमत का टरवु शकत नाही..?
5) साखरकारखाने अन राजकारण - एक कारखाना उसाला 2500 रुपये भाव देतो तर दुसरा कारखाना उसाला 1800 -2000 रुपये भाव देतो..का काय 2000 रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर अन् 1800-2000  रुपये भाव देनार्या कारखान्याची साखर यात काय फरक असतोय का.. ?
6) साखरकारखाने शेतकर्यानां तो आमुक तमुक पार्टीचा माणुस आहे म्हणून Blackmail करण कितपत योग्य आहे...?
7)साखरकारखाने , कॄषीउत्पंन्न बाजार समीती, जिल्हा सहकारी बँक , या अन शेतकर्‍यां संबंधीत संस्थाशी शेतकर्‍यांचा जास्त सबंध येत असतानाही  या संस्था कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या ताब्यातच का आसतात...? 
8)या बँका , कारखाने तोट्यात चालतात असे दाखवुन त्यावर सरकारी पॅकेज मिळवली जातात पण त्याचा शेतकर्‍यांना खरच फायदा होतोय का...?

या व इतर समस्या नाही सोडवता आल्या किंवा शेती विषयी प्रश्न असेच अनुत्तरीत राहत राहीले  तर  शेतकरी रसातळाला जायला वेळ लागणार नाही. आणि दुर्दैवाने आपण याचे साक्षीदार असू...! 
✍️ लेखक:- मल्हारी भिल्लारे (एन.डी.ए क्लार्क खडकवासला, पुणे)

✍️ संकलन:- राहुल शिंदे, विभागीय संपादक उस्मानाबाद (9975114800)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध